कुंडल पोलीस स्टेशन
  ०२३४६२२८१११
  कुंडल ग्रामीण रुग्णालय
  ८९५६७५६७०४
  कुंडल बस स्थानक
  ०२३४६२७११६६
  श्री. रामचंद्र दत्तात्रय महाडिक
  ९९६०९२४००१
  श्री. महादेव चंद्रशेखर यलाटे
  ९०२१६०३७५०
  सौ. देवयानी सुरेश कुलकर्णी
  ९४०५५५४२७७
  श्री. माणिक रंगराव सूर्यवंशी
  ९९६०९६८००८

    कुंडलचा राजा सत्येश्वर यांना गौतम ऋषींच्या शापामुळे संध्याकाळी शरीरावर व्याधी होत असायची काही दिवसानंतर सध्याचा सागरेश्वर येथे राजा शिकारीसाठी गेला असता दुपारी विश्रांतीच्या वेळेला त्यांनी त्या कुंडात हात पाय धुतले. राजा घरी गेल्यानंतर राणीच्या लक्ष्यात आले कि जेवढे शरीर त्या कुंडातील पाण्याने भिजले त्या ठिकाणची व्याधी नष्ट झालेली समजली व राणीने चौकशी केली असता त्या ठिकाणचा पत्ता घेऊन राजाचे सर्व शरीर त्या पाण्याने स्वच्छ केले रोग पूर्णपणे बारा झाला.
    ही सगळी घटना घडल्यानंतर राणीने एक मन तांदूळ तेथील पिंडीना वाहिले ते तांदूळ वाहत असताना तीन पिंडीना तांदूळ पुरवटी आले नसल्याने जे तीन महादेव होते ते सत्यश्वर राजाच्या पांढरीत येऊन राहिले अशी आख्यायिका आहे.
    कुंडल मध्ये तीन महादेव मंदिराजवळ १२ वर्षातून एकदा भागिरर्थी उगम पावते. कन्या राशीस गुरु आल्यानंतर तीन महादेव मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला पाजर फुटतो आणि मागील बाजूस भागिरर्थी उगम पावते.
    जे येणारे पाणी आहे त्याचा औद्योगिक पद्धतीने जरी उपसा केला तरी एक वर्षभर पाणी कमी होत नाही. पाण्याची चव देखील अमृतासारखी असते अस म्हणलेलं वावग ठरणार नाही. पाणी आलेल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी ओटी भरली जाते. हा उत्सव १२ वर्षातून एकदा येत असल्याने लोक खूप लांबून ते पाहण्यासाठी येऊन पाण्याने स्नान करून पावित्र्य मिळवतात. आता येणारी भागिरर्थी २०२८ साली येईल.